Wednesday, December 8, 2010

महासत्तेचा बुडबुडा

भारत महासत्ता बनेल म्हणजे नेमकं काय घडेल?
आपण खुप सुखवस्तू झालेले असू? की किमान पातळीवर भूकबळी, दारीद्र्य, बेरोजगारी अशा समस्यांचं उच्चाटन होईल? आपल्याला ठाऊक नाही। कारण ‘भारत महासत्ता बनणार आहे.’ येवढी गोष्ट ऐकूनच बरं वाटतं. मग महासत्ता म्हणजे नेमकं काय याची दखल घेतली काय नि नाही काय ? काय फ़रक पडतो आपल्याला?
पण आपल्याला आपल्या अज्ञानाची किंमत चूकती करावी लागणारच आहे. आजही आपण ती चूकती करतो आहोत. असो. मूळात महासत्ता म्हणजे नेमकं काय याचं ठोस उत्तर कुठल्याच राजकारण्याकडे नाही. आठवड्याला एक या प्रमाणे राजकारणी आणि त्यांच्या संगनमाताने होत असलेले घोटाळे बाहेर पडू लागले आहेत.(उघड न होणारे घोटाळे वेगळे.) या सर्व घोटाळ्यांचं खापर एखाद्या सोईच्या व्यक्तीवर फ़ोडलं जातं. त्यात त्याला शिक्षाही पुरेशी होत नाही. शिवाय पब्लिकचा पैसाही परत मिळण्याचा प्रश्न उत्पन्न होत नाही.एकाही राजकारण्याकडे स्वत:ची अशी कुठली ‘विकस योजना’ नाही. पण हवे ते खाते मिळवण्याची महत्वाकांक्षा तेवढी नक्की आहे. ती सुद्धा उघड.
इकडे आपण कळत असून दुर्लक्ष करणारेच आहोत. आपल्याकडे सुद्धा स्वतःच्या भविष्याचा कुठला प्लॅन असतो. आणि तसाच तो सामाजिक पातळीवरही नसतो. शहरांमधे आज जी बकाली झाली आहे. त्याला आपणच जबाबदार आहोत. आणि अशी बकाली घालवायला आपल्याला खुप कष्ट देखिल पडणार नाहीयेत। पण तरी आपण साध्या-सुध्या गोष्टी करणं शक्य असूनही करत नाही. त्याची किंमत आपणच चूकवतो आहोत.
भारत महासत्ता बनो न बनो. आपण महासत्तेसाठी लागणा-या मानसिकतेपासून कोसो दूर आहोत. तेव्हा आपले राजकारणी काहीही बरळोत., अशा बुडबूड्यांमधे शिरून आपल्या हाती काय लागणार आहे हे ज्याचं त्याने ठरवावं. आपले ‘साहेब’ मंत्री झाले तरी आपल्याला कुणी फ़ुकट जेवायला घालत नाही. त्यासाठी शांत राहून कष्ट करावेच लागतात.

1 comment:

  1. लोकांना झुलवायाला चांगला शब्द आहे 'महासत्ता'!

    ReplyDelete